प्रतिनिधी
बेलवाडी :- इंदापूर तालुक्यातील सणसर येथील विजय अंबादास क्षीरसागर यांच्या म्हसोबावाडी (ता. इंदापुर) गावच्या हद्दीत कवडे वस्ती लगत जमीन गट नंबर 338 मध्ये असलेल्या विहिरीचं रिंग बांधकाम सुरु होते. मात्र, अचानक या विहिरीचा मुरूम कोसळला आणि त्यासोबत लावलेली रिंग देखील खाली कोसळली. त्यामुळे त्यावर काम करत असलेले मजूर देखील विहिरीत दबल्याची माहिती समोर आली आहे.
काल मंगळवार दि.(1 ऑगस्ट) रोजी रात्रीच्या दरम्यान विहिरीमध्ये रिंग पडून व मुरूम ढासळून सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय.35 वर्ष),जावेद अकबर मुलानी(वय. 35 ), परशुराम बन्सीलाल चव्हाण(वय 30 वर्ष) मनोज मारुती सावंत( वय 40 वर्षे, सर्व रा. बेलवाडी, ता.इंदापूर, जि. पुणे )हे दबले गेले आहेत.
रात्री अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांची एकच धावपळ उडाली. दरम्यान, कामगारांना मुरूमाखालून काढण्यासाठी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून स्थानिक नागरिक आणि पोलिस प्रशासनाचे रात्रीपासून घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.
👁️ Post View : 2,340